Pages

Tuesday 14 December 2010

संताप व महाराष्ट्र (वाचा विचार करा)

कधी कधी विचार मनात यायचा कि आपन मराठी भाषेचा,महाराष्ट्राचा,मुंबई चा असा आग्रह का धरतो.प्रादेशिक विचार सोडुन आपल्या देशाचा इतर देशबांधवांचा का विचार करीत नाही.त्यांचा द्वेश का करतो.पण मला कळले की याच प्रादेशिक स्वाभिमानाची,अस्मीतेची आज महाराष्ट्राला अत्यंत गरज आहे,महाराष्ट्रेतर इतर संस्कृती आपन आपली म्हणुन आदर करतो पण पंजाबि,गुजराती,दक्षिण भारत ई.लोक मराठी म्हणजे घाटी संबोधतात मराठी संस्कृती म्हणजे डाऊन मार्केट म्हणुन हीनवतात.आणी दिल्ली तिल लांडगे आपल्यालाच देशबंधुत्वाचे धडे देतात.ज्यांना आमचा आमच्या संस्कृतीचा तिटकारा वाटतो त्यांचा का म्हणुन आम्ही त आदर करावा?शेवटी एक विचार येतो आमच्यावर ही परिस्थिती का यावी. खरच आम्ही एवढे निष्क्रिय,नित्कृष्ट,नेभळट आहोत का.कि आमचा स्वाभिमान,अस्मिता,लाज आम्ही गहाण टाकली.कि आम्हाला स्वतःची लाज वाटते.आज आपल्या महाराष्ट्राच्या सर्व महानगरात जे जे मोठे मॉल ,व्यापारी संकुलं,दुकाने या पैकी एक टक्का सुद्धा मराठी माणसाचे नाही.आलीशान बंगले,फ्लँट मधे सर्व अमराठी माणसं राहतात.मराठी माणुस चाळीत झोपडपट्टित कुत्र्या मांजरा सारखा जगतोय त्यात भर यु.पि.बिहाऱ्‍यांची.आणी म्हेणे महाराष्ट्रात राहनारे सर्व मराठी कसले डोंबलाचे मराठी.याच वृत्ती मुळे आम्ही महानगरात अल्पसंख्य होत आहोत.यांना जर महाराष्ट्राचा एवढा पुळका तर जेथे पैसा तेथेच हे दिसतात आणी वसतात कधि एखादा परप्रांतीय शेत मजुर म्हणुन पाहीला का?पाच दहा वर्षे इथे राहीलं आणी तोडकं मोडकं मराठी बोलता आल म्हणजे कुणी मराठी होत नसतं,
क्रमशः

0 comments:

Post a Comment